Martyrs' Day : आम्हाला या शूर हुतात्म्यांची नावे घेण्याचा अधिकार नाही



काही दशकांपूर्वी, या दिवशी, तीन हिंदू तरुणांनी आपल्या मातृभूमीसाठी आणि आपल्या देशवासियांसाठी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आणि सर्व हिंदूंच्या मनात क्रांतीची ज्योत जागृत करण्यासाठी आनंदाने बलिदान दिले होते!!!!

तेव्हाही हा हिंदू समाज इतका संवेदनाहीन होता की, शतकानुशतके गुलामगिरीच्या गर्तेत शांतपणे झोपलेल्या या हिंदू समाजाला जागे करण्यासाठी श्री भगतसिंग, श्री सुखदेव, श्री राजगुरूजी यांसारख्या अगणित हिंदू तरुणांच्या मृत्यूचा बहिरा आक्रोश आवश्यक होता.

जेव्हा काही राजकीय कोल्हे आणि अहिंसेच्या पुजार्यांनी मिळून देशासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या कृतीला भरकटलेल्या तरुणांनी केलेली चूक म्हटले आणि या बलिदानाला भुलून या देशबांधवांनी स्वातंत्र्यानंतर त्याच लोकांच्या हाती सत्ता सोपवली, तेव्हा नेमके ज्यांच्यासाठी त्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या लोकांची चूक झाली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरू तेग बहाद्दूर जी, चार साहेबजादे आणि लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत आपण अशी अगणित पापे केली आहेत आणि या पापांचे फलित म्हणजे आज हा हिंदुस्थान स्वतंत्र असूनही येथे जातीयवादाचा,  राजकीय गुलामगिरीचा प्रदेश आहे.

आजही अखंड हिंदु राष्ट्राच्या भौगोलिक सीमा सातत्याने आकुंचन पावत आहेत, आपल्यात रुजलेल्या धर्मनिरपेक्षतेने आणि पोकळ देशभक्तीने भारताच्या सीमेत काश्मीर, बंगाल, केरळ असे विभाजन निर्माण केले आहे, आपल्या स्वार्थी लोभी दुर्बुद्धीने देशद्रोही, जातीयवाद,  सारख्या देशद्रोही विचारसरणीला जन्म दिला आहे!!! 

गंमत म्हणजे पश्चात्तापाच्या आगीत होरपळून राष्ट्र आणि धर्माप्रती कर्तव्यनिष्ठ होण्याऐवजी कर्तव्याच्या अभावाच्या गर्तेत पडलो आहोत, अपराधीपणाच्या भावनेपासून कोसो दूर, आपण अशा आभासी जगात वावरत आहोत जिथे या देशाच्या धर्माविरुद्ध सर्व काही घडत असूनही आपल्यात सर्व काही ठीक आहे, आणि चुकूनही आपल्याला काही समजले, तर आपली क्षुद्र विचारसरणी ‘स्वार्थी विचारसरणी’ म्हणायला भाग पाडते आहे का? आम्ही त्यांना सत्तेत का बसवले? असे सांगून, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील पोकळ देशभक्ती आणि भक्तीची ज्योत क्षणात विझवून पुन्हा पेटवून! बौद्धिक देशभक्त असल्याचा खोटा दाखला घेऊन स्वतःला धन्य समजणारे आम्हांला या शूर हुतात्म्यांची नावे घेण्याचा अधिकार नाही !!!

(मूळ हिंदी लेख - विशाल दादा शर्मा, अनुवाद - नेहा रोहित तांबे)







Post a Comment

0 Comments